साहित्य प्रकार

Friday, September 14, 2012

ना माणसात माणूस


ना माणसात माणूस, ना घरात घरपण उरले
का अश्मयुगाचे पुन्हा, हे आदिम वारे फिरले?

बगल देऊनी जाती, ते सगे सोयरे सारे
नात्यांचे तरी धागे, मी उगाच ताणून धरले

अंक नाटकासारखे, हे जगणे तुझे नि माझे
ऐलापासून पैला, जग सोंगाड्यांनी भरले

ना आभाळ माझे हे, ना तुझे चांदणे तेही.
आलो होतो मोकळे, अन तसेच जाणे ठरले.

ते गीत सुधाकरीचे का कुणास नाही कळले?
गाणार्‍याचे गीतही, का असेच जगणे सरले?

No comments:

Post a Comment