साहित्य प्रकार

Tuesday, August 7, 2012

वेगळे ना व्हायचे होते मला

वेगळे ना व्हायचे होते मला
स्वत:सच जोखायचे होते मला

गर्दीत ही गेलो नाही मी कधी
एकांतात जगायचे होते मला.

कुणाशी ना बोललो तरी येथे
नसून मी असायचे होते मला.

दु:ख माझे सांगू मी कसे तुला?
वेदनेत हसायचे होते मला.

आजन्म हा तुजसाठी झिजवूनी
मजसाठी उरायचे होते मला.

चुकूनी मी वाट आलो स्मशानी
माणसातच जायचे होते मला.

राजा होणे राजाचीही नकल होती

खरी कहाणी विदुषकाची विकल होती
राजा होणे राजाचीही नकल होती

फ़ितूर झाले माझेच प्यादे आज इथे,
तशी न कोणत्या फ़िरंग्यांची मजल होती.

खरे सांगतो पराभूत मी तिथे झालो.
जिथे माझ्य़ा छाव्यांची नजर अचल होती.

पाय ठेवला विश्वासाने मी जिथेही
तिथे मानवी किड्यांची ही दलदल होती.

लढत रहाण सतत रणांगणात जिवनाच्या
हिच माझ्या आयुष्याची खरी गझल होती.

बालम की गलीं में.........!

हां... ये रसमें ये कसमें सभी तोड के,
तु चली आ चुनर प्यार की ओढ के |
या चला,....जाऊंगा,...मै ये जग छोड के |
सात्वीक प्रेमानं भरलेल्या, र्‍हुदयाच्या एका खोल खोल तळापासून आलेली ही हाक, संवेदनशील मनाला भाव व्याकुळ केल्याशिवाय रहात नाही. हे शब्द आहेत आनंद बक्षी यांचे, ज्यानी बॉलिवुड्च्या दुनियेला पुराणी यादें
म्हणुन तिन हजाराहून अधिक गाणी दिली. आणि दर्दभरा स्वर ज्याच्या प्रवाहात ए॓कणारा प्रत्यकजन पुर्णपणे
नाहूण निघेल तो म्हणजे मुकेश यांचा. ( चित्रपट - कटीपतंग)
जिस जगा याद तेरी सताने लगे,
उस जगा एक पल भी ठेहेरना नही |
जिस गलीमें तेरा घर ना हो बालमां,
उस गलींसे हमें तो गुजरना नहीं |
आजही बहुतेकानां वाटतं, की खरंच ते जुने दिवसच किती सुंदर होते. पण आज ते राहीलं नाही. आणि
माणसा-माणसातील ते सात्वीक प्रेमही उरले नाही. कोणास ठाऊक तसं झालं आहे काय, पण खर्‍या प्रेमाची
त्या वेड लावणार्‍या क्षणांची आणि क्षणा क्षणाला आठवण करून देणार्‍या खर्‍या प्रेमाची एक अस्सल अनुभूती
या शब्दातच नाही का? त्या चोरून भेटण्याच्या जागा, रानफुले, नदी किणारे, झाडा झुडुपांचे आडोसे आणि
रात्रीचा चंद्र कोरून येणारं निखळ चांदणं. आपल्याच नकळत हे किती तरी आपल्या प्रेमाचे साक्षीदार असतात.
व म्हणुनच त्या ठिकाणी आपण परत कधी एकटेच गेलो तर एक क्षणभर देखिल थांबनं किती मुश्कील होऊन जातं.
या गाण्याचं पहीलं कडवं, जे मला अतिशय आवडतं -
जिंदगी में कई रंग रलीयाँ सहीं,
हर तरप मुस्कुराती ये कलीयाँ सहीं,
खु-बसु- रत बहारों की गलीयाँ सहीं |
जिस चमन में तेरे पग में काटें चुबें,
उस चमन सें हमें फुल चुनना नहीं |
जिस गली में...........................!
आSss हा.ss.हांssss फुलांची फुलबाग असो वा सोन्याची सुवर्णनगरी, जिथे माझ्या प्रियेला किंचीतस ही
दु:खं पोहोचेल, अशी वाटच मला चालायची नाही. या पहील्या कडव्यातच आनंद बक्षी यांना दाद दिल्या शिवाय
दुसरा पर्यायच उरत नाही. या अप्रतिम निर्मितीत आणखी एक सिंहाचा वाटा म्हणजे आर.डी. बर्मन यांचा. अतिशय अफलातुन असं संगीत त्यांनी दिले आहे. गाण्याचं प्रत्यक कडवं संपताच एक बासरी(फ्लुट) वाजते. काळजाला स्पर्श करून जाणारी. फार व्याकुळ वाटतं तेंव्हा.......!

शब्दांच्या मी वादळातला एक नारा

अमृताच्या पैजा मी गा जिंकणारा.
शब्दांच्या मी वादळातला एक नारा.

माणसात मी माणसाला शोधणारा
गर्दीच्या मी ढगा आडचा एक तारा.

अनाठायीच मांडला मी हा पसारा
जीवन आहे स्वप्नांचाच खेळ सारा.

विनासुखाचा कशास ये जन्मफ़ेरा
दु:ख घालते घडीघडीस येरझारा.

कश्या सावरू उरातल्या या त्सूनामीं ?
डोळ्यांमधल्या सागरास कुठे किणारा.

काय फ़ायदा पेटवूनी या मशाली?
डोळसांच्या अंधाधुंदी कारभारा

दुनियेमध्ये भिड माजली असत्याची
सत्याचाच रोज होतो कोंडमारा.

नकोस येऊ माणसात पुन्हा मेंढरा
फिरतो इथे अजून आहे अदिम वारा.

अंधाराचा झाकतो हा गुढ पिसारा
परी शब्दांचा उजेड नच लोपणारा.

आई

जसं तू शिकवलंस, तसं आई जग नाही.
तुझ्यातल्या कष्टाची कुणातही धग नाही.

ओलांडल्या किती जरी, अवकाश्याच्या सिमा
तुझ्यासमान कुठेच अम्रुताचा ढग नाही

कोसळले जर अभाळ, सहज पेलण्यासाठी
तुझ्या इतके माझे मन अजून सजग नाही.

अवती भोवती फ़िरतात, दिलाश्याची भुते
पण तुझ्या जागी इथे कुणाचाच तग नाही.

मना मनात आहे धुके दाटलेले

मना मनात आहे धुके दाटलेले
ओठांत एक गाणे मुके गोठलेले.

कळपामध्ये जे ही मला भेटलेले
न्हवते कुणीच वेडे, वेड घेतलेले.

दिसतात जरी हे.. चेहरे हसलेले
प्रत्यकाच्या उरात युध्द पेटलेले.

आसक्तते पोटी.. प्रेम बाटलेले
चंदा पायी एका सुर्य झाकलेले.

विश्वासाने सांग सत्य भेटलेले
अविश्वासाचे का मेघ दाटलेले?

दिसवयास सारे वरून नटलेले
हिरवे झाड परी आतून वटलेले.

डोळ्यात मेघ राणी वेगे भरून आले.

नाहीच कोण येथे आले बनून ढाले*
छातीत खोल माझ्या गेले रुतून भाले.

पश्च्यात* कोण माझी चेष्टा करून गेले
डोळ्यात मेघ राणी वेगे भरून आले.

सोडून गाव आता जावे निघून कोठे?
गावात निंदकांचे पाढे रचून झाले.

आहेस कोण तू ही? आला कशास येथे?
माझाच भास मजला कोडे अशक्य घाले.

ओठात शब्द खोटा नाही कधीच आला
सत्याचे रोज ओठा द्यावे कुठून प्याले.

कोणास कोण खांदा कोणी कुणास वांदा
विश्वात गैर आता गाडा असाच चाले.

-----------------------------------------------------------------------------
ढाले = अंगावर येणारे वार ढालीने अढवणारा, दुसर्‍याचा जीव वाचवणारा.
पश्च्यात = उद्देशीत व्यक्ती नसताना, मागुर्‍या. चेहर्‍याआड
-----------------------------------------------------------------------------