साहित्य प्रकार

Showing posts with label ललित. Show all posts
Showing posts with label ललित. Show all posts

Friday, September 14, 2012

किसीने आपना बनाके मुझको

            जीवनात सर्वाधीक आनंदाची अशी कोणती गोष्ट आहे? .. या प्रश्नाला तसं एकच एक उत्तर असेल असं कधी होणार नाही. व्यक्ती तितक्या प्रकृती या नियमाप्रमणे अनेकांची अनेक वेगवेगळी उत्तरे असतील. पण मला तरी वाटतं कि, ज्यावेळी एखाद्यास त्याच्या आयुष्यात प्रथमत:च अत्यानंद होतो. आणि त्याला झालेला तो आनंद हा केवळ आपल्यामुळे झालेला आहे. हे जेंव्हा कळते तेंव्हा आपल्याला होणारा आनंद हीच आपल्या आयुष्यातील सर्वाधीक आनंदाची गोष्ट आसते. एका आनंदातून निर्माण झालेला दुसरा अवर्णनिय आनंद. म्हणजेच एका सुखातून उत्पत्ती पावलेलं दुसरं अमर्याद सुख.

           आनंद नावाच्या एका माणसाने, आनंद निर्भर होत याच आनंददायी जीवनाची ही अपुर्व संकल्पना आपल्या शैलीदार अभिनयातून मांडली आहे. कोण हा माणुस?... देवानंद?.... अगदी बरोबर. ... दिग्दर्शक अमिया चक्रवर्ती यांनी दिग्दर्शीत केलेला पतिता- १९५३. या चित्रपटामध्ये राधा नावच्या एका पतित मुलीची हृदयद्रावक कहाणी आहे. जी आपल्या एका हताने पांगळ्या असलेल्या वडीलांचा व स्वत:चा भिक्षा मागून उदरनिर्वाह करत असते. आणि तृतिय स्तरावर असलेल्यांचे जगणे म्हणजे क्षणा क्षणाला एक तारेवरेची कसरत असते. याच मानवी समाज्यातील प्रत्येक घटकाला बांधील नसतानाही प्रत्येक गोष्टीला मनाविरूध्द पण तोंड द्यावेच लागते. तशी ही राधा, एका भिक्षूकेच जगणं जगत असताना देखील या निर्दय जगाला शिताफ़ीने तोंड देत जगता जगता अक्षरशा हैराण झालेली. एकाकी जीवनाला कसलाच आधार नाही. चुरगळलेल्या कागदासारखं आयुष्य आणि ते ही जीव मुठीत धरून जगावं लागतं. एकाकी स्त्री म्हणजेच अबला म्हणून उंबर्‍याबाहेर पडताच प्रत्येक परपुरूषाची नजर एखाद्या विषारी सर्पाप्रमाणे काळजाला डसते. रात्र काळी झाली की, काश्याची चकाकणारी घागर देखिल काळीच दिसते. अशावेळी कसं जगायचं? कोणावर विश्वास ठेवायचा? चहूबाजूने अंधारलेल्या राधाच्या आयुष्यात तिच्या दुबळ्या मनाची केवढी तरी उलाघाल होत असते. आणि अशाच एका काळीजवेळी पैसामागून पैस पार करत  आनंद नावाची एक रोशनी अचानक तिच्या आयुष्यात येते. निर्मल (देवानंद) हा कोण कुठला परका माणुस पण जिव्हाळ्याचं काळीज असलेला कोणीतरी प्रथमच तिला भेटतो. आणि सुरू होते नजरेची जुगलबंदी. अनोळखीतील संकोच्याची आणि संकोच्यातून सलज्ज भावनांची डोळ्यातून स्पष्ट बोलणारी एक अबोल कविताच आकार घेऊ लागते. आणि राधाला ज्या क्षणांचा स्वप्नातही भरवसा न्हवाता त्याची प्रत्यक्ष अनुभूती येऊ लागते.आत्तापर्यंतच्या आयुष्यात तिला भेटलेले सारेच तिचा अव्हेर करणारे, तिला फेटाळणारे होते. पण आज तिचं आंतरमन जाणून घेणारं आणि आत्मीयतेनं बोलणारं व पुढे कधी ना कधीतरी हे जीवनच आपलंस करून घेण्याची आपेक्षा असणारं असं कोणीतरी भेटलं होतं.  अता तिच्या चेहर्‍यावर कधी न्हवे ती हास्याची लाली दिसू लागते, एका अंधार्‍या गुहेतून ती प्रथमच सोनेरी सुर्यप्रकाशात आल्याप्रमाणे स्वत:ला विसरून तनाने आणि मनानेही आत्मनिर्भर होऊन गाऊ लागते......

किसीने आपना बनाके मुझको, मुस्कुराना सिखा दिया
अन्धेरे घरमें किसीने हसके, चिराग जैसे जला दिया |

शरमके मारे मै कुछ ना बोली, नजरने परदा गिरा दिया
मगर वो सबकुछ समज गये है, के दिल भी मैने गवाँ दिया ।

ना प्यार देखा, ना प्यार जाना, सुनी थी लेकिन कहानीयाँ
जो ख्वाब रातों में भी ना आया, वो मुझको दिन में दिखा दिया ।


वो रंग भरते है जिन्दगी में, बदल रहा हैं मेरा जहाँ
कोई सितारे लूटा रहा था, किसी ने दामन बिछा दिया ।

या गाण्यातील मराठी अभिनेत्री राधा म्हणजेच ऊशा किरण हिने गाण्यातील भावमधूर शब्दाला तितकीच साजेशी अशी अदाकारी पेश केली आहे. शब्दांचे वेड असलेल्या एखाद्याला केवळ तिच्या आदाकारीच्या मोहामुळेच हे गाणे प्रत्यक्ष पुन्हा पुन्हा पहावेसे वाटेल. ऊशा किरणची ही लाजवाब आदाकारी वर्णन करताना खरेतर शब्दच कमी पडतात.

शरमके मारे मै कुछ् ना बोली, नजरने परदा गिरा दिया
मगर् वो सबकुछ् समज गये है, के दिल् भी मैने गवाँ दिया ।

ना प्यार् देखा, ना प्यार् जाना, सुनी थी लेकिन् कहानीयाँ
जो ख्वाब रातों में भी ना आया, वो मुझको दिन में दिखा दिया ।   .... आहाहा....  लाजवाब !

            नवतारूण्यातील् ही किती चपखल अशी शब्द् योजना आहे. उभरत्या वयात प्रेमाच्या अनेक् अनोळखी भावनांची आपल्या मनात् कशी अगदी चलबिचल् होत् असते. पर्ंतू प्रत्येक् भावनेचे वा जाणिवेचे इतक्या सहज  सुंदर शब्दात कधीच वर्णन करता येत नाही.


                                               -----------------------------------------   क्रमश:

मेरी बात रही मेरे मन में


आयुषात कधी कधी अचानक आपल्याला अनोळखी असे कोणीतरी सहप्रवासी म्हणुन भेटते.आणि हा सहप्रवास चालू होतो तशी ओळख देखिल वाढत जाते. व ध्यनी मनी नसताना अत्तापर्यंत वेगवेगळे असलेल्या दोन जीवनगाण्याचे सूर जुळू लागतात. कालांतराने या ओळखीचे रुपांतर दृढ स्नेहाच्या मैत्रीत होते. मग रोजच्या व्यवाहारात आपण एकमेकांची सुख दु:खे वाटून घेऊ लागतो. अडीअडचणीत एकमेकाला मदतीचा हात देऊ करतो. आणि हळुहळू या क्षणमात्र प्रवासाची अविट गोडी वाढत जाते. ओळखीच्या झालेल्या त्या अनोळखीचा प्रवास अता नेहमीच हवा हवासा वाटू लागतो. दोघांतील कुणाच्यातरी अंधारलेल्या आयुष्यात कधी न्हवे ते टिपूर चांदणे उगवून येते. रोज रुसणारे ऋतू आज हसणारी फ़ूले घेऊन येतात आणि सारं आयुष्यच कसं बहरून जात. परंतू आपल्या आसुयेनं बरबटलेल्या नियतीला नेमकं हेच नको असतं. कोणतही नातं कितीही दृढ झालं तरी आपलं वैयक्तिक, वेगळं, स्वत:च असं एक जग असत की, ज्यामध्ये आशा काही गोष्टी असतात की त्या आपण इतर कोणालाही सांगू शकत नाही. आणि ज्या कोणाला खरेच सांगायचे असते ती व्यक्ती आणि सांगण्याची वेळ नियती कधीच जुळू देत नाही. मनात तर खुप काही गजबजलेलं असतं. आत खोल कुठेतरी एक अनावर भावकल्लोळ माजलेला असतो. आणि नेमका याच वेळी सहप्रवासही संपलेला असतो. अत्तापर्यंत आपल्याच नकळत मनात घर करून बसलेलं कोणीतरी जायला निघतं. त्याला हसर्‍या चेहनं निरोप द्यायची वेळ येते. पण हसनंच कुठे हरपलेलं असतं. आणि निरोपाच्या क्षणी हे मन मोकळ करणं केवळ अशक्य असतं. अता वेळ निघून गेल्यावर बोलण्यात ही काही अर्थ नसतो.
मन कसं अगदी सैरभैर होतं. आपण भानावर येण्याधीच, जाणारा तो आपल्या वाटेने चार पावले पुढे निघूनही गेलेला असतो. आपण शिताफ़ीने चेहर्‍यावर हसू आणत एक हात उंचावून निरोप देऊ लागतो. पण व्याकूळलेल्या मनात मात्र विरहाचे थेंब पागोळ्याप्रमाणे ठिबकत असतात.......

मेरी बात रही मेरे मन में,
कुच्छ केहेना सकी उलझन में ।
मेरे सपने अधूरे, हुये नही पुरे,
आग लगी जीवन में ।
मेरी बात रही मेरे मन में........

ओ रसीयॉं मन बसीयॉं,
नसनसमें हो तुम ही समायें
मेरे नयना करे बैना,
मेरा दर्द ना तुम सुन पायें ।
जिया मोरा प्यासा रहा सावन में ।
मेरी बात रही मेरे मन में........

कुच्छ केहेते, कुच्छ सुनते,
क्युं चले गये दिल को मसल के?
मेरी दुनिया हुइ सूनी,
बुझा आस का दिपक जल के
छाय रे अन्धेर मेरि अखियन में
मेरी बात रही मेरे मन में................

... शकील बदायुनीचे शब्द, आशाचा दर्द भरा आवाज आणि हेमंत कुमार यांच हृद्द करणारं संगीत.                        (चित्रपट- साहब बिवी और गुलाम-गुरुदत्त)

या गाण्याला त्याच्या आशया इतकाच वहिदाचा भावव्याकूळ चेहरा लाभला आहे. गाण्याचा संवेदनशील कान असणार्‍या प्रत्यकालाच हे गाणे ओतप्रोत आनंद देऊन जाते. इथे एका विरहानं उसवलेल्या मनाच्या कितीतरी आवस्था चित्रमयपणेच रेखाटल्या आहेत. शेवटी असाह्य होऊन ती प्रेयसी म्हणते....

तुम आओं.. की, न आओं
पिया याद तुम्हारी मेरे संग है ।
तुम्हे कैसे..., ये बताऊ
मेरे प्रीत का निराला इक रंग है।

... काहीतरी कायमच हरवून गेलं आहे. आणि येणार्‍या भविष्याचा प्रत्येक दिवस केवळ आठवणीवरच जगायचा आहे. किती अवघड असतं हे जगणं, नाही का?