साहित्य प्रकार

Monday, August 6, 2012

"दुष्काळाचा गाव आमचा "


दुष्काळाचा गाव आमचा, वेशीवरती मरण टांगले.

तहानलेलेच जीव तरी जगण्यासाठी मुठीत बांधले.


पाण्याच्या या थेंबापायी जगणे येथे मरण झाले,

हिजड्यांच्या का राजकारणात पावसाळे ही सामिल झाले?


पांढरपेशी पुढार्‍यांच्या शब्दावाटेच सुकाळ आले,

तसे मेघांचे ही हत्ती निळे, मुकाटपणे झुलून गेले.


आठवता आठवत नाही हे कुण्या जन्माचे पाप झाले,

टोपीवाले माकड देखिल इथे आमचे बाप झाले.

No comments:

Post a Comment