सांजकाळी कशी दाटते,मनात माझ्या हुरहूर. |
कुण्याकाळचा फ़िरुनी येतो,जुन्या स्मृतींचा पूर. |
सागराची लाट जणू रुद्र त्सूनामी वादळाची |
किती आवरू किती सावरू सये फ़ुटून जातो उर. |
दिलीस जेंव्हा हसूनी मजला खोटी वचने तेंव्हा |
स्वप्नभूलीत घोड्यानेही चौखूर उधळले खूर. |
नेहमीच असतो तसाच आहे आजही येथे मी |
तरी आरसा कशास दावी हा जगावेगळा नूर |
भूत-भविष्या मध्ये अडकला,क्षणभराचा वर्तमान |
किती चाललो तरी रिकामा वाट जाते दूर दूर. |
मुक्या जिवाचा मुक्या मनाशी मुकेपणी रोज तंटा |
कधी यायचा तुझ्या नि माझ्या गाण्याला एक सूर. |
किती चाललो जपून होतो तरीही लागली ठेच |
नशीब मेले असेच जाते देऊन हतावर तूर |
कुणी कसेही बोलून गेले नि दिले जिव्हारी घाव |
किती भोगले अन सोसले असताना मी बेकसूर. |
Friday, September 14, 2012
सांजकाळी कशी दाटते
Labels:
कविता
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment