साहित्य प्रकार

Saturday, October 6, 2012

स्वत:लाच पेरायचे कुठे कुठे

स्वत:लाच पेरायचे कुठे कुठे
स्वत:लाच वेचायचे कुठे कुठे

उभा जन्म बांधायचा नको तिथे
स्वत:लाच गोवायचे कुठे कुठे

शकूनीच झाले कसे जिथे तिथे
युधीष्टीर शोधायचे कुठे कुठे?

दलालीच फोपावली पदोपदी
स्वत:लाच वाटायचे कुठे कुठे

अशी वाट दूरावते पुन्हा पुन्हा
दिशाहीन चालायचे कुठे कुठे

नको दोष देऊ असा पुन्हा मला
तडीपार हिंडायचे कुठे कुठे

नको वाद घालू नको रडारडी
पुन्हा खेळ मांडायचे कुठे कुठे

Thursday, September 20, 2012

देवा...!

देवा...!
तुझ्यापाठी माझा काहीच त्रागा नाही,
पण इथे माणसाला माणसात जागा नाही.

फुटपातवरही कोणी माणसच असतात    
नि, काचबंगल्यातही माणसच असतात
जी एकाच नभाखाली एकाच जगात रहातात
पण एकत्र असूनही ती एकमेकात मिसळलेली का नसतात?

देवा...!
धरतीला जसा अगम्य रंग चढवलास
तसा इथे प्रत्येकालाच वेगळा घडवलास.

त्या अनुदिनी नक्की तुझ्या मनात काय होतं
जेंव्हा आदिमांच जिवाश्म जन्मास येत होतं?
तुझ्या दिव्य स्पर्शाचं इथे काय चिज होतं?
जेंव्हा आभाळाच्या काळजातूनच आपुलकीच बळ हारवतं.

Sunday, September 16, 2012

चालायाचे नाही मजला

चालायाचे नाही मजला जुनेच रस्ते पुन्हा पुन्हा.
झाले गेले गतकाळी ते मनात ठसते पुन्हा पुन्हा.

जिंकावे मी कसे स्वत:ला लढून संगर जीवना?
नियती माझी मला हरवण्या, कंबर कसते पुन्हा पुन्हा

सत्यापाठी पळता पळता विरून जाता स्वप्नही,
उपहासाने नशीब माझे मलाच हसते पुन्हा पुन्हा.

आभाळाला शिवण्यासाठी रोज मारतो उंच उडी
अंदाजाचा डाव बेरकी, छलांग फसते पुन्हा पुन्हा

जख्मांवरती फूंका टाकत, आनंदाने जगू अता
याच मानवी योनीमधले जीवन नसते पुन्हा पुन्हा

आशेच्या या हिंदोळ्यावर, आनंदाने झुलू जरा
स्वप्नांचेही येणे जाणे कधीच नसते पुन्हा पुन्हा

Friday, September 14, 2012

किसीने आपना बनाके मुझको

            जीवनात सर्वाधीक आनंदाची अशी कोणती गोष्ट आहे? .. या प्रश्नाला तसं एकच एक उत्तर असेल असं कधी होणार नाही. व्यक्ती तितक्या प्रकृती या नियमाप्रमणे अनेकांची अनेक वेगवेगळी उत्तरे असतील. पण मला तरी वाटतं कि, ज्यावेळी एखाद्यास त्याच्या आयुष्यात प्रथमत:च अत्यानंद होतो. आणि त्याला झालेला तो आनंद हा केवळ आपल्यामुळे झालेला आहे. हे जेंव्हा कळते तेंव्हा आपल्याला होणारा आनंद हीच आपल्या आयुष्यातील सर्वाधीक आनंदाची गोष्ट आसते. एका आनंदातून निर्माण झालेला दुसरा अवर्णनिय आनंद. म्हणजेच एका सुखातून उत्पत्ती पावलेलं दुसरं अमर्याद सुख.

           आनंद नावाच्या एका माणसाने, आनंद निर्भर होत याच आनंददायी जीवनाची ही अपुर्व संकल्पना आपल्या शैलीदार अभिनयातून मांडली आहे. कोण हा माणुस?... देवानंद?.... अगदी बरोबर. ... दिग्दर्शक अमिया चक्रवर्ती यांनी दिग्दर्शीत केलेला पतिता- १९५३. या चित्रपटामध्ये राधा नावच्या एका पतित मुलीची हृदयद्रावक कहाणी आहे. जी आपल्या एका हताने पांगळ्या असलेल्या वडीलांचा व स्वत:चा भिक्षा मागून उदरनिर्वाह करत असते. आणि तृतिय स्तरावर असलेल्यांचे जगणे म्हणजे क्षणा क्षणाला एक तारेवरेची कसरत असते. याच मानवी समाज्यातील प्रत्येक घटकाला बांधील नसतानाही प्रत्येक गोष्टीला मनाविरूध्द पण तोंड द्यावेच लागते. तशी ही राधा, एका भिक्षूकेच जगणं जगत असताना देखील या निर्दय जगाला शिताफ़ीने तोंड देत जगता जगता अक्षरशा हैराण झालेली. एकाकी जीवनाला कसलाच आधार नाही. चुरगळलेल्या कागदासारखं आयुष्य आणि ते ही जीव मुठीत धरून जगावं लागतं. एकाकी स्त्री म्हणजेच अबला म्हणून उंबर्‍याबाहेर पडताच प्रत्येक परपुरूषाची नजर एखाद्या विषारी सर्पाप्रमाणे काळजाला डसते. रात्र काळी झाली की, काश्याची चकाकणारी घागर देखिल काळीच दिसते. अशावेळी कसं जगायचं? कोणावर विश्वास ठेवायचा? चहूबाजूने अंधारलेल्या राधाच्या आयुष्यात तिच्या दुबळ्या मनाची केवढी तरी उलाघाल होत असते. आणि अशाच एका काळीजवेळी पैसामागून पैस पार करत  आनंद नावाची एक रोशनी अचानक तिच्या आयुष्यात येते. निर्मल (देवानंद) हा कोण कुठला परका माणुस पण जिव्हाळ्याचं काळीज असलेला कोणीतरी प्रथमच तिला भेटतो. आणि सुरू होते नजरेची जुगलबंदी. अनोळखीतील संकोच्याची आणि संकोच्यातून सलज्ज भावनांची डोळ्यातून स्पष्ट बोलणारी एक अबोल कविताच आकार घेऊ लागते. आणि राधाला ज्या क्षणांचा स्वप्नातही भरवसा न्हवाता त्याची प्रत्यक्ष अनुभूती येऊ लागते.आत्तापर्यंतच्या आयुष्यात तिला भेटलेले सारेच तिचा अव्हेर करणारे, तिला फेटाळणारे होते. पण आज तिचं आंतरमन जाणून घेणारं आणि आत्मीयतेनं बोलणारं व पुढे कधी ना कधीतरी हे जीवनच आपलंस करून घेण्याची आपेक्षा असणारं असं कोणीतरी भेटलं होतं.  अता तिच्या चेहर्‍यावर कधी न्हवे ती हास्याची लाली दिसू लागते, एका अंधार्‍या गुहेतून ती प्रथमच सोनेरी सुर्यप्रकाशात आल्याप्रमाणे स्वत:ला विसरून तनाने आणि मनानेही आत्मनिर्भर होऊन गाऊ लागते......

किसीने आपना बनाके मुझको, मुस्कुराना सिखा दिया
अन्धेरे घरमें किसीने हसके, चिराग जैसे जला दिया |

शरमके मारे मै कुछ ना बोली, नजरने परदा गिरा दिया
मगर वो सबकुछ समज गये है, के दिल भी मैने गवाँ दिया ।

ना प्यार देखा, ना प्यार जाना, सुनी थी लेकिन कहानीयाँ
जो ख्वाब रातों में भी ना आया, वो मुझको दिन में दिखा दिया ।


वो रंग भरते है जिन्दगी में, बदल रहा हैं मेरा जहाँ
कोई सितारे लूटा रहा था, किसी ने दामन बिछा दिया ।

या गाण्यातील मराठी अभिनेत्री राधा म्हणजेच ऊशा किरण हिने गाण्यातील भावमधूर शब्दाला तितकीच साजेशी अशी अदाकारी पेश केली आहे. शब्दांचे वेड असलेल्या एखाद्याला केवळ तिच्या आदाकारीच्या मोहामुळेच हे गाणे प्रत्यक्ष पुन्हा पुन्हा पहावेसे वाटेल. ऊशा किरणची ही लाजवाब आदाकारी वर्णन करताना खरेतर शब्दच कमी पडतात.

शरमके मारे मै कुछ् ना बोली, नजरने परदा गिरा दिया
मगर् वो सबकुछ् समज गये है, के दिल् भी मैने गवाँ दिया ।

ना प्यार् देखा, ना प्यार् जाना, सुनी थी लेकिन् कहानीयाँ
जो ख्वाब रातों में भी ना आया, वो मुझको दिन में दिखा दिया ।   .... आहाहा....  लाजवाब !

            नवतारूण्यातील् ही किती चपखल अशी शब्द् योजना आहे. उभरत्या वयात प्रेमाच्या अनेक् अनोळखी भावनांची आपल्या मनात् कशी अगदी चलबिचल् होत् असते. पर्ंतू प्रत्येक् भावनेचे वा जाणिवेचे इतक्या सहज  सुंदर शब्दात कधीच वर्णन करता येत नाही.


                                               -----------------------------------------   क्रमश:

डोळ्यांनी डोळ्यांशीच बोलावे

डोळ्यांनी डोळ्यांशीच बोलावे
मनाचे गुज मुक्यानेच खोलावे.

नाते नभाशी आपसूक जुळावे
पापणीने पावसा पापणीत तोलावे.

कधी वर्दळीच्या सोडून वाटा
स्वत:स शोधत एकाकीच चालावे

कधी तू मला अन मी तूला ही,
केवळ एका स्पर्शानेच आकळावे.

असो कोणताही ऋतू परंतू,
नाते हे मनामनात दरवळावे

ज्या नभाशी सुर्य होते पेटले

ज्या नभाशी सुर्य होते पेटले
त्या नभाशी पावसाळे दाटले

पावसाने पावसाला गाठले
माणसाने माणसाला लाटले

काय नाही मी मुक्याने सोसले?
भावनेने भावनेला छाटले.

जात नाही धर्म नाही देखिले
मी दुकानी वेदनेला थाटले.

कोळश्याचे कोळशाला वावडे
चांदव्याने काजवेही बाटले.

काय घेऊ काय देऊ मी कुणा
नग्न होते जे मलाही भेटले.

मेरी बात रही मेरे मन में


आयुषात कधी कधी अचानक आपल्याला अनोळखी असे कोणीतरी सहप्रवासी म्हणुन भेटते.आणि हा सहप्रवास चालू होतो तशी ओळख देखिल वाढत जाते. व ध्यनी मनी नसताना अत्तापर्यंत वेगवेगळे असलेल्या दोन जीवनगाण्याचे सूर जुळू लागतात. कालांतराने या ओळखीचे रुपांतर दृढ स्नेहाच्या मैत्रीत होते. मग रोजच्या व्यवाहारात आपण एकमेकांची सुख दु:खे वाटून घेऊ लागतो. अडीअडचणीत एकमेकाला मदतीचा हात देऊ करतो. आणि हळुहळू या क्षणमात्र प्रवासाची अविट गोडी वाढत जाते. ओळखीच्या झालेल्या त्या अनोळखीचा प्रवास अता नेहमीच हवा हवासा वाटू लागतो. दोघांतील कुणाच्यातरी अंधारलेल्या आयुष्यात कधी न्हवे ते टिपूर चांदणे उगवून येते. रोज रुसणारे ऋतू आज हसणारी फ़ूले घेऊन येतात आणि सारं आयुष्यच कसं बहरून जात. परंतू आपल्या आसुयेनं बरबटलेल्या नियतीला नेमकं हेच नको असतं. कोणतही नातं कितीही दृढ झालं तरी आपलं वैयक्तिक, वेगळं, स्वत:च असं एक जग असत की, ज्यामध्ये आशा काही गोष्टी असतात की त्या आपण इतर कोणालाही सांगू शकत नाही. आणि ज्या कोणाला खरेच सांगायचे असते ती व्यक्ती आणि सांगण्याची वेळ नियती कधीच जुळू देत नाही. मनात तर खुप काही गजबजलेलं असतं. आत खोल कुठेतरी एक अनावर भावकल्लोळ माजलेला असतो. आणि नेमका याच वेळी सहप्रवासही संपलेला असतो. अत्तापर्यंत आपल्याच नकळत मनात घर करून बसलेलं कोणीतरी जायला निघतं. त्याला हसर्‍या चेहनं निरोप द्यायची वेळ येते. पण हसनंच कुठे हरपलेलं असतं. आणि निरोपाच्या क्षणी हे मन मोकळ करणं केवळ अशक्य असतं. अता वेळ निघून गेल्यावर बोलण्यात ही काही अर्थ नसतो.
मन कसं अगदी सैरभैर होतं. आपण भानावर येण्याधीच, जाणारा तो आपल्या वाटेने चार पावले पुढे निघूनही गेलेला असतो. आपण शिताफ़ीने चेहर्‍यावर हसू आणत एक हात उंचावून निरोप देऊ लागतो. पण व्याकूळलेल्या मनात मात्र विरहाचे थेंब पागोळ्याप्रमाणे ठिबकत असतात.......

मेरी बात रही मेरे मन में,
कुच्छ केहेना सकी उलझन में ।
मेरे सपने अधूरे, हुये नही पुरे,
आग लगी जीवन में ।
मेरी बात रही मेरे मन में........

ओ रसीयॉं मन बसीयॉं,
नसनसमें हो तुम ही समायें
मेरे नयना करे बैना,
मेरा दर्द ना तुम सुन पायें ।
जिया मोरा प्यासा रहा सावन में ।
मेरी बात रही मेरे मन में........

कुच्छ केहेते, कुच्छ सुनते,
क्युं चले गये दिल को मसल के?
मेरी दुनिया हुइ सूनी,
बुझा आस का दिपक जल के
छाय रे अन्धेर मेरि अखियन में
मेरी बात रही मेरे मन में................

... शकील बदायुनीचे शब्द, आशाचा दर्द भरा आवाज आणि हेमंत कुमार यांच हृद्द करणारं संगीत.                        (चित्रपट- साहब बिवी और गुलाम-गुरुदत्त)

या गाण्याला त्याच्या आशया इतकाच वहिदाचा भावव्याकूळ चेहरा लाभला आहे. गाण्याचा संवेदनशील कान असणार्‍या प्रत्यकालाच हे गाणे ओतप्रोत आनंद देऊन जाते. इथे एका विरहानं उसवलेल्या मनाच्या कितीतरी आवस्था चित्रमयपणेच रेखाटल्या आहेत. शेवटी असाह्य होऊन ती प्रेयसी म्हणते....

तुम आओं.. की, न आओं
पिया याद तुम्हारी मेरे संग है ।
तुम्हे कैसे..., ये बताऊ
मेरे प्रीत का निराला इक रंग है।

... काहीतरी कायमच हरवून गेलं आहे. आणि येणार्‍या भविष्याचा प्रत्येक दिवस केवळ आठवणीवरच जगायचा आहे. किती अवघड असतं हे जगणं, नाही का?

वेदनांचा भारगाडा...


नागमोडी वाट झाली चालता ही येत नाही
चालतो ती वाट आता, सोडता ही येत नाही.

वेदनांचा भारगाडा ओढता ही येत नाही.
भालरेषा ही अभागी, खोडता ही येत नाही.

दावलेसी तू कशाला इंद्रधनुचे रंग सारे?
भंगलेले स्वप्न आता, जोडता ही येत नाही.

गोवलेसी तू कशाला रेशमाचे बंध येथे?
बांधलेला जन्म आता, तोडता ही येत नाही.

काळ गेला डाव आला खेळता ही येत नाही
मांडलेला खेळ आता, मोडता ही येत नाही.

आसवांना पापणीत पेलता ही येत नाही
साचलेला आत टाहो, फोडता ही येत नाही.

वेगळे ना व्हायचे होते मला


वेगळे ना व्हायचे होते मला
स्वत:सच जोखायचे होते मला

गर्दीत ही गेलो नाही मी कधी
एकांतात जगायचे होते मला.

कुणाशी ना बोललो तरी येथे
नसून मी असायचे होते मला.

दु:ख माझे सांगू मी कसे तुला?
वेदनेत हसायचे होते मला.

आजन्म हा तुजसाठी झिजवूनी
मजसाठी उरायचे होते मला.

चुकूनी मी वाट आलो स्मशानी
माणसातच जायचे होते मला.
स्वत:सच जोखायचे होते मला

गर्दीत ही गेलो नाही मी कधी
एकांतात जगायचे होते मला.

कुणाशी ना बोललो तरी येथे
नसून मी असायचे होते मला.

दु:ख माझे सांगू मी कसे तुला?
वेदनेत हसायचे होते मला.

आजन्म हा तुजसाठी झिजवूनी
मजसाठी उरायचे होते मला.

चुकूनी मी वाट आलो स्मशानी
माणसातच जायचे होते मला.

राजा होणे राजाचीही नकल होती


खरी कहाणी विदुषकाची विकल होती
राजा होणे राजाचीही नकल होती

फ़ितूर झाले माझेच प्यादे आज इथे,
तशी न कोणत्या फ़िरंग्यांची मजल होती.

खरे सांगतो पराभूत मी तिथे झालो.
जिथे माझ्य़ा छाव्यांची नजर अचल होती.

पाय ठेवला विश्वासाने मी जिथेही
तिथे मानवी किड्यांची ही दलदल होती.

लढत रहाण सतत रणांगणात जिवनाच्या
हिच माझ्या आयुष्याची खरी गझल होती.

शब्दांच्या मी वादळातला एक नारा.


अमृताच्या पैजा मी गा जिंकणारा.
शब्दांच्या मी वादळातला एक नारा.

माणसात मी माणसाला शोधणारा
गर्दीच्या मी ढगा आडचा एक तारा.

अनाठायीच मांडला मी हा पसारा
जीवन आहे स्वप्नांचाच खेळ सारा.

विनासुखाचा कशास ये जन्मफ़ेरा
दु:ख घालते घडीघडीस येरझारा.

कश्या सावरू उरातल्या या त्सूनामीं ?
डोळ्यांमधल्या सागरास कुठे किणारा.

काय फ़ायदा पेटवूनी या मशाली?
डोळसांच्या अंधाधुंदी कारभारा

दुनियेमध्ये भिड माजली असत्याची
सत्याचाच रोज होतो कोंडमारा.

मना मनात आहे धुके दाटलेले


मना मनात आहे धुके दाटलेले
ओठांत एक गाणे मुके गोठलेले.

कळपामध्ये जे ही मला भेटलेले
न्हवते कुणीच वेडे, वेड घेतलेले.

दिसतात जरी हे.. चेहरे हसलेले
प्रत्यकाच्या उरात युध्द पेटलेले.

आसक्तते पोटी.. प्रेम बाटलेले
चंदा पायी एका सुर्य झाकलेले.

विश्वासाने सांग सत्य भेटलेले
अविश्वासाचे का मेघ दाटलेले?

दिसवयास सारे वरून नटलेले
हिरवे झाड परी आतून वटलेले

मायबोली


सळसळूनी शब्दगाणी बोलताती झाड वेली.
अमृताहून जीवनाच्या गोड माझी मायबोली

नादब्रम्ह साचलेली जेथ आहे गहन खोली
अर्थगर्भ जीवनाचा सांगते ही मायबोली.

माय माझी बोलली जी, तिच मी ही शिकलेली
बोबडा मी बोलताना मित झाली मायबोली.

बाळबोध जिवणीशी एकदा मी बांधलेली.
तिच आज बोलतो मी काळजाची मायबोली.

परभाषी पावसाची झड आली झड गेली
तोलली मी वादळात एक माझी मायबोली.

चोखळोनी पैस सारा ज्ञानदेवे रचियेली
माऊलीची साऊली ही शब्दरुप मायबोली.

चंद्र


ओंठांत गंजल्या माझ्या
मी मंत्र बांधले होते.
दोघात नदीच्या काठी
आधी कोण बोलले होते?

ते गीत सांज उन्हांचे
या देहात मुरले होते.
दोघांच्या अबोलपणी ते
सांग कुणी गायले होते?

पाण्यात उतरता शेजा
मी स्वप्न सांधले होते.
सोडून हात तू जाता,
का परतून पाहीले होते?

तू चंद्र व्हावेस माझा म्हणूनी,
मी सुर्य लोटले होते.
’वेड्या!’ गौर केतकी माझे,
मी हात पोळले होते.

आई


जसं तू शिकवलंस, तसं आई जग नाही.
तुझ्यातल्या कष्टाची कुणातही धग नाही.

ओलांडल्या किती जरी, अवकाश्याच्या सिमा
तुझ्यासमान कुठेच अम्रुताचा ढग नाही

कोसळले जर अभाळ, सहज पेलण्यासाठी
तुझ्या इतके माझे मन अजून सजग नाही.

अवती भोवती फ़िरतात, दिलाश्याची भुते
पण तुझ्या जागी इथे कुणाचाच तग नाही.

अंतर


हे असं नेहमीच कसं जादूमंतर होतं
सारं ज्ञान वेळ निघून गेल्यानंतर होतं

तो समाज ही एक आरसा होता भिववणारा
तसं तुझ्या माझ्यात ते कितीसं अंतर होतं?

त्या दिवशी तू पहीलेलं अतीभव्य वादळ
हे देखिल माझ्याच मनाच एक अवांतर होतं

आणि आज पहाटे मी पाहीलेलं ते स्वप्न
हे तुझ्या येण्यासारखच काव्यमंतर होतं.

काळीज पोखरुन स्वप्नांनीच जागा केली
तसं तुझ्याशिवाय हे जगणंच निरंतर होतं.

या भरल्या कळपातून कुठेतरी दूर जाणं
हेच फक्त आता शेवटचं गत्यंतर होतं .

गुलमोहराचे रान


हृदयाच्या त्या शब्दासाठी हरवून सारे भान.
होते कधीचे अतुरलेले माझे हळवे कान

अवचित आले तुझ्याकडूनी होकाराचे दान
आणि माझ्या मनात फ़ुलले गुलमोहराचे रान

तुझ्या वाचुनी भासत होती सृष्टी ही निशप्राण
तुला पाहता चराचराला क्षणात आला प्राण

रुप आगळे तुझे साजणी लावण्याची खाण
लपून पाहे फ़ूलांअडूनी वेलीवरचे पान.

कशास करशी रुप सोहळे,लावूनी दिपमाळ?
उठून दिसते चांदण्यात ही तुझे चांदणी वाण

वाजत येई वाटेवरूनी ऋतू ऋतूंचे गाण
आपण दोघे सहप्रवासी दिगंतराचे छान

कशास करशी उगाच चिंता हरून सारे त्राण?
जगणे माझे तुझ्याचसाठी शतजन्माची आन.

काळजात या अजून आहे तुझ्या स्मृतींचे पान
गतकाळाचे क्षण गुलाबी मांडून बसले ठान

असेल कोण राजा त्याचा ताज असूदे महान
भातुकलीची दिवली सुध्दा अमर प्रीतीची शान

लक्ष फूलांनी जरी बहरले दिशा दिशांचे रान,
आधी वेचण्या सुधाकरी फूलराणीचा मान.

ओळख


तू असा आहेस, तू तसा आहेस,
मतानुसार जो तो बोलला.
पण पुरेपूर कोण ओळखतो कुणाला?

कधीतरी सांगता येईल तुला?
कोणता रंग असतो उन्हाला?

निदान, हे तरी सांग मला!
आयुष्याचा कोण झुलवतो झुला?

नाव हीच ओळख असते प्रत्यकाला,
तसा पुरेपूर कोण ओळखतो कुणाला?

इथे तर माझाच मी ओळखत नाही मला.

अज्ञाताच्या वाटेवर...........!


चल!.. आज नव्या वाटेने जाऊ,
जिथे असतील कळ्या ही उत्सूक,
गंध सांडून फूलण्यासाठी.
काट्यांचं ही दु:खं विसरून,
तुझ्या माझ्यासाठी.

अंगावर ऊठवाया पावलांची नक्षी,
अतूर असतील वाटा,
अन उर फोडून नाचत असतील,
ओढ लागलेल्या पाणलाटा.

खाली वाकलं असेल आभाळ,
जिथे रंग निळा घेऊन,
फक्त तुझ्या माझ्यासाठी.
तेथेच घडूदे आज एकदा
या हृदयाच्या गाठीभेटी.

ओसाड असलं रान तरी,
जे देईल अंतराची हाक
अनवाणीच जाऊ तिथे,
पावलावरती पाऊल टाक.

गुंतवून घेऊ पायात,
आडव्या तिडव्या वाटा,
रुतला जरी काटा,
वहिवाटेला देऊ फाटा.

मिसळून जाऊ एकमेकात,
स्वच्छ उन्हाच्या मृगजळात.
सावल्या ठेवू कोरून,
भिरभीरणार्‍या डोळ्यात.

आभाळाचा संधीप्रकाश
असेल जिथे गोठलेला.
गाणे गात जगत असेल,
अश्वथ ही पिळवटलेला.

चल.. जाऊ आज तिथे,
जिथे येईल मेघ उतरून,
गंध घेऊन सौख्याचा.
अन दु:खाचे ही गीत होऊन,
गाव लागेल आनंदाचा.

कुणी मला हेटाळले कुणी मला फ़ेटाळले.


कुणी मला हेटाळले कुणी मला फ़ेटाळले.
मनासाठी विरंगुळे, मी पुस्तकात चाळले.

घर माझे इथे जेंव्हा निंदकांनीच जाळले
अनाठायी सुख माझे, त्याच वणव्यात पोळले.

अशी काय झाली आज या उजेडाला बाधा
की,तमाच्या लोभाने, दिवे सारे विटाळले.

गेल्यावर सोडून तू एकाकीच मला येथे
नभानेही चांदण्यास, गा आसवांत ढाळले.

दूर कुठे दिठीआड, सुख माझे झोपलेले
मीच माझे दु:ख इथे, चंदनाशी उगाळले.

माणसाच्या ठायी मी दैत्य जेंव्हा पाहीले
माणसाच्या स्थळी अता, जाण्याचे मी टाळले

दिली तुला दान सारी माझी मी ही जिंदगी
तरी कसे दुज्यावरीच, खुळे मन तुझे भाळले.

वागू नकोस अशी तू माणसाच्या नियतीसम
नियतीने शब्द नाही, कधी कुणाचे पाळले.

अवकाळी जाऊ नको सोडून तू एकट्याला
तुझ्यामुळे क्षणभराचे, जीवन हे गंधाळले.

जन्म गेला सारा हा, वाहूनीया पालखी
कधीतरी भेट देवा, भोयी पण भेंडाळले

आनिकंही रोजचीच व्यवहारही रोजचेच
तरी मन पांडूरंगा, तुज ठायी घोटाळले.

आसवे ही लपवूनी फिरू नको पाठमोरी
सुधाकरी मांडता मी, भाव तुझे शब्दाळले